"दम मारो दम' हा चित्रपट देशातील अंमली पदार्थांचे जाळे व त्या विश्वातील संकटांवर आधारित असून अतिशय फॅशनेबल व रोमांचक चित्रपट आहे, असे अभिनेत्री बिपाशा बसूने म्हटले आहे.
बिपाशा म्हणाली, "दम मारो दम' हा चित्रपट देशातील अंमली पदार्थांचे जाळे व त्या विश्वातील संकटांवर आधारित असून अतिशय फॅशनेबल व रोमांचक चित्रपट आहे. "ड्रग्जवर आधारित असलेल्या या चित्रपटात अनेक सत्य घटनांचा वापर करण्यात आला आहे. परंतु, "दम मारो दम' हा अंधारमय चित्रपट नसून खूपच रोमांचक चित्रपट आहे. चित्रपटाचा विषय खूपच चांगल्या पद्धतीने मांडण्यात आला आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात झाले असून, बिपाशा बसू, राणा दग्गुबती, प्रतीक बब्बर व अभिषेक बच्चन यांच्या चित्रपटात भूमिका आहेत.
0 comments:
Post a Comment